बालविकास संघ आणि चिन्मय मिशन, मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ६ सप्टेबर २०१७ ते रविवार दि. १० सप्टेबर २०१७ ह्या कालावधीत “गीता ज्ञानयज्ञ” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प.पु. ब्रह्मचारी विवेक चैतन्यजी ह्यांनी सायंकाळच्या सत्रात श्रीमद् भगवत गीतेच्या दुसर्या अध्यायातील ३७ ते ७२ श्लोकांवर मराठीतून निरुपण केले. तर सकाळच्या सत्रात स्वामीजींनी ईशावास्योपनिषदावर इंग्रजीतून निरुपण केले. वरील कार्यक्रम चेबूर मधील श्री. चंद्रकांत नारायण उपाध्ये आणि कुटुंबीयांनी दिवंगत कै. ह.भ.प. नारायण रंगनाथ उपाध्ये आणि कै. कमलाबाई नारायण उपाध्ये ह्यांचे स्मरणार्थ प्रायोजित केला होता. चेंबूरवासियांचा ह्या कार्यक्रमाला उत्तम पतिसाद मिळाला.